महसूल व कृषी अधिकारी यांच्या हलगर्जीपणा मुळे शेतकऱ्यावर अन्याय

mhcitynews
0
संग्रहित फोटो 

तुळजापूर प्रतिनिधी

अतिवृष्टी मध्ये नुकसान व बाधित झालेल्या पिकांचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या यादीतून तुळजापूर तालुका वगळल्या बाबत महाविकास आघाडी तुळजापूरच्या वतीने सोमवार दि. 7 रोजी तहसीलदार तसेच तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.


अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना सुद्धा पिकांचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या यादी मधून तुळजापूर तालुका वगळल्याने शेतकऱ्यात संताप व्यक्त केला जात असून महसूल अधिकारी व कृषी अधिकारी यांच्या हलगर्जी व निष्काळजीपणामुळे तालुक्यातील नुकसानीची माहिती शासन ला वेळेवर देऊ शकले नसल्याने संपूर्ण तालुका वगळला गेला त्यामुळे शेतकऱ्यावर एक प्रकारे अन्याय झाला.

तालुक्यातील बाधित शेतकरी फळबागांची नुकसान पिकांचे नुकसानीची माहिती तात्काळ शासनाला देऊन नुकसान भरपाई लवकरात देण्यात यावी अन्यथा महाविकास आघाडी तुळजापूर मार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.


यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, जनसेवक अमोल भैया कुतवळ, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, शिवसेना नेते श्याम पवार, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तोफिक शेख, संजय देशमुख, निहाल पठाण, सुनील चंद्रहार जाधव, शरद जगदाळे, सह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top