जेथे राम कथा होते ते ठिकाण साक्षात तीर्थस्थान ! - प्रजापती विष्णुदास

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी

ज्या ज्या ठिकाणी राम कथा किंवा हरिकीर्तन होते ते ठिकाण साक्षात तीर्थस्थान असते. ते ठिकाण साधारण असूच शकत नाही असे प्रतिपादन प्रजापती विष्णुदास इस्कॉन धाराशीव यांनी केले. आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉन धाराशिव व हरे कृष्ण भक्त तुळजापूर आयोजित कासार गल्लीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील तीन दिवशीय राम कथेत ते बोलत होते. ज्या-ज्या वेळी पृथ्वीवर पाप वाढते त्या-त्या वेळी भगवंताला अवतार घ्यावा लागतो. श्रीराम अवतार हा त्यातीलच एक अवतार आहे. तीन दिवशीय राम कथेत प्रभूजींनी राम जन्मापासून रावणाच्या वधापर्यंत श्री रामांच्या सर्व लीला सांगितल्या. शबरी मातेला त्यांच्या गुरुंनी तुला राम दर्शन होईल असे सांगितले होते. शबरी माता याच वचनावर विश्वास ठेवून प्रभू रामाची नित्य वाट पाहत असे. वयाच्या आठ वर्षापासून ती श्रीरामाच्या दर्शनासाठी आतुर झाली होती आणि निश्चय हा पक्का होता. तिचा उत्साह कधीही कमी झाला नाही. ती अगदी धैर्याने प्रभुंची वाट पाहत होती. शेवटी वयाच्या 80 व्या वर्षी प्रभू श्रीरामांनी तिला साक्षात दर्शन दिले यावरून हेच सिद्ध होते की भक्तामध्ये उत्साह, विश्वास व धैर्य असल्यास भगवंताची भेट शक्य आहे.आताही आपल्यामध्ये हे तीन गुण असल्यास भगवंत प्राप्ती याच जन्मात शक्य आहे असे प्रभूजींनी सांगितले. 

         

राम वनवासात असताना भरत भेट झाली तेव्हा त्यांच्यातील बंधुप्रेम पाहून श्रोत्यांचे डोळे पान्हावले. प्रभू रामासाठी भरताने जो त्याग केला तो अवर्णनीय आहे असे प्रभुजी म्हणाले.

       

कथेनंतर भक्तांकडून एक माळ जप करून घेण्यात आला. त्यानंतर आरती होऊन ग्रंथदिंडी काढण्यात आली. ग्रंथ दिंडीमध्ये महिला व पुरुष यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यानंतर महाप्रसाद झाला. यामध्ये २५० ते ३०० भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top