भवानी रोड ते किसान चौक रस्ता रुंदीकरणाचे काम अंतिम टप्यात – मा. नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांची माहिती

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी

शहरातील हुतात्मा चौक ते किसान चौक रस्त्याच्या १२ मीटर रुंदीकरणाचे काम अंतिम टप्यात असून, या कामासंदर्भातील भूसंपादन प्रक्रियेबाबत महत्त्वपूर्ण माहिती मा. नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.


सदर रस्ता रुंदीकरणाचा ठराव क्र. ४१५ दिनांक १३-०९-२०१३ रोजी पारित झाला होता. यात दोन्ही बाजूने समान भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर नगर रचनाकार, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली कालम ३७ अंतर्गत फेरबदल प्रस्तावास २२-१२-२०१७ रोजी मान्यता मिळवण्यासाठी शासनाशी पत्रव्यवहार करण्यात आला.


दि. २७-०३-२०१८ रोजी बाधित मालमत्ता धारकांची सुनावणी घेऊन त्याचा अहवाल दि. ११-०५-२०१८ रोजी शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार २३-०७-२०१९ रोजी आर्य चौक ते किसान चौक या भागातील १२ मीटर रुंदीच्या रस्त्याच्या विकास योजनेस मान्यता देण्यात आली.


यानंतर भवानी चौक ते आर्य चौक या भागासाठी अधिसूचना काढण्यासाठी ८-६-२०२३ रोजी प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आणि दिनांक ४-१०-२०२४ रोजी अधिसूचना अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.


मा. आमदार राणाजगजितसिंह पाटील हे भूसंपादन प्रक्रियेचा स्वत गांभीर्याने पाठपुरावा करत असून, येत्या दोन-तीन महिन्यांत भूसंपादनाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याचे मा. नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी स्पष्ट केले.


या पत्रकार परिषदेस शहरातील अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. त्यात बाळासाहेब शिंदे, शांताराम पेंन्दे, भालचंद्र मगर, शिवाजी बोडले, समर्थ पैलवान, निलेश रोचकरी, लखन पेंन्दे, इंद्रजीत साळुंके, शहाजी भांजी, लक्ष्मण नन्नवरे, गुलचंद व्यवहारे, सुहास साळुंके, त्रुषी साळुंके, किशोर गंगणे, गिरीष देवाळकर, आनंद कंदले, जटाळ, राजेश्वर कदम यांचा समावेश होता.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top