समाज माध्यमातील पत्रकारिता क्षेत्रातील एक हिरा म्हणजे ज्येष्ठ पत्रकार, नवोदितांचे मार्गदर्शक, निर्भीड आणि ज्यांची लेखणी नेहमीच आमच्यासारख्यांना दिपस्तंभ ठरते ते धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघांचे जिल्हा उपाध्यक्ष मा. श्रीकांतजी कदम त्यांचा आज वाढदिवस ...
पत्रकारिता ही एक अशी प्रणाली आहे की यात काम करणाऱ्या माणसाच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानार्जन व ज्ञानदान संपत नाही, खरेतर श्रीकांतजी यांच्या पत्रकारितेने तुळजापूर तालुका अनेक वर्ष गाजला आणि गाजतो ही आहे, प्रचंड अभ्यास, शांत वृत्ती, नव्या विषयाचा अभ्यासुपणा, शिक्षण, शेती , सहकार, सामाजिक बांधिलकी, प्रशासन , राजकारण इतकेच नव्हे तर तुळजापूरच्या ऐतिहासिक संस्थांना पासून ते तुळजापूरच्या मातीतले काय गुणधर्म इथपर्यंत ते तुळजापूरच्या हजारो वर्षांचा इतिहास काय सांगतो ? याचं चालतं बोलतं विद्यापीठ त्यांच्यात ठासून भरलेले आहे.
तब्बल 25 वर्षाच्या तुळजापूरच्या पत्रकारितेच्या झंझावतात या माणसाने लेखणीला मोठी धार आणली. प्रशासनातील अधिकाऱ्यांवरचे आसूड असोत अथवा राजकारण्यांची केलेली चिरफाड असो, विविध विषयावरचे लेखन हे नेहमीच चर्चेचे विषय ठरले आहेत.
यापुढे जाऊन सांगायचे तर तुळजापूरसारख्या भागात पत्रकारिता करणारा हा माणूस नेहमीच निकोप आणि दर्जेदार लिखाण करीत त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे,
श्रीकांतजी कदम यांना वाढदिवसानिमित्त खुप सार्या शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य चांगले आरोग्य लाभो आणि त्यांचे सर्व संकल्प पूर्ण होओत याच मनस्वी सदिच्छा...
संपादक....
