ओमराजेच उमेदवार आहे समजून भैयांना भरघोस मतांनी निवडून द्या - खासदार ओमराजे निंबाळकर

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 
खासदार ओमराजे निंबाळकरच आहे असे समजून अँड. धिरज भैय्या पाटलानां भरघोस मतानी निवडून द्या असे अवाहन खासदार ओमराजे निंबाळकरानी सोमवार दि.२८ रोजी विधानसभा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर तुळजापूर येथील पुजारी मंडळ कार्यालयात मेळाव्यात केले. प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संभाजी महाराज पुतळा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत भव्य रँली काढून उमेदवारी भरला. खचाखच भरलेल्या पुजारी मंडळाच्या सभागृहात आयोजित मेळाव्यात खासदार ओमराजे निंबाळकर बोलत होते. 


तुळजापूर तालुक्याने मला ५५ हजाराची लीड दिली. माझ्याच तोडीचा निष्ठावान माणूस म्हणजे धिरज भैय्या पाटील उभे आहेत. तुळजापूर तालुक्यातील जनतेने त्या हालगीवाल्या कांबळे मामाचा आदर्श घ्यावा. मामा गरीब आहे, फाटकातुटका आहे. पण लोकसभेच्या निवडणुकीत त्याने आपले ईमान विकले नाही. मोठ्या हिमतीने ओमराजेच खासदार होणार असे ठणकावून सांगितले. विरोधी भाजपाच्या आमदराच्या घरच्यांनी ४०वर्षे नेतृत्व केले. देशात मागासलेल्या यादीत आपला जिल्हा तीन नंबरचा म्हणून गणला जातोय. नेतृत्व करणारे कुंटुब मात्र श्रीमंत नुसते उद्घाटने करू नका, आधी २१ टीएमसी पाणी आणून दाखवा, तेर येथील संत गोरोबाकाका च्या डोक्यावरील पत्रे काढतात आले नाहीत, ते हि काम मधुकरराव चव्हाण साहेबांनी केले, चालू आमदाराने रेल्वेचे भुसंपादन सक्तीने केले आहे, जरांगे पाटलांच्या उपोषणावेळी महीला भगीनी जनतेवर लाठीचार्ज झाला. त्यावेळी तुम्ही त्याचा साधा निषेध केला नाही, आम्हाला राजकारण स्वतःला भोगायचे नाही. सामान्य समाजासाठी राजकारण करायचे आहे. लिंगायत समाजाच्या समस्ये विषयी मी लोकसभेत बोललो विरोधी आमदार ईकडे फक्त उद्घाटने करत सुटले आहेत, मागील विम्याच्या पंचनाम्याच्या प्रती प्रशासनाला विमा कंपनीने अद्याप दिल्या नाहीत, दोन वर्षे झाली आहेत, म्हणून धिरजभैय्या पाटलानां मोठ्या मताधिक्याने निवडून आणावे असे अवाहन केले. 

मी ही तुळजापूर चा पाटील आहे, विधानसभेच्या या आखाड्यात कुस्ती खेळायला तयार आहे, पाटील घराण्याने मागील पंन्नास वर्षाच्या ऐकनिष्ठतेच फळ म्हणून मला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे. याच काँग्रेस पक्षाने तुळजापूर तालुक्याचा विकास केला आहे. या वेळी मागील तुळजापूर तालुक्यातील माजी आमदार साहेराव हंगरगेकर, शिवाजीराव बाभळगावकर, आलुरे गुरुजी, नरेंद्र बोरगावकर, मधुकरराव चव्हाणांचां आदराने उल्लेख करून बरच विरोधक ऐकत्र आलेत. पण ही सामान्य जनता माझ्या बरोबर आहे. मी जिल्हा परिषद अध्यक्ष असतानाही एकही पैसा न खाता प्रत्येक विभागाला भरघोस निधी दिला, विरोधी भाजपाच्या आमदाराला उद्घाटन्या रोग झाला आहे, प्रत्येक विकास कामाचे चार चार वेळा फक्त उद्घाटने करत आहेत, मोबाईल फेसबुकवर प्रसार माध्यमात फसवी जाहीरात केली जात आहे, तुळजाभवानी मंदिराला एक रुपायाही निधी न देता मंदिराच्याच पैश्यावर उद्घाटने करत सुटले आहेत असे अँड.धिरज पाटीलांनी आपल्या भाषणात म्हटले.


यावेळी तालुकाध्यक्ष रामदादा आलुरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील, शिवसेना शहर प्रमुख सुधीर कदम,शिवसेना महीला आघाडी नेत्या शालताई वडणे, डाँ.जितेंद्र कानडे,खलील शेख,नळदुर्ग शहाबाज काझी,बंजारा समाजाचे हरीदास जाधव,भाऊ भांजी,माधव आण्णा कुतवळ,शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी, इत्यादी वक्त्यांनी भाषणे केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुबेर शेख यानी केले तर आभार माधवराव कुतवळ यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top