वृक्षमित्र अरुण पवार यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणारा स्व. प्रा. संजय आर्य स्मृती समाजभूषण पुरस्कार मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र व उद्योजक अरुण पवार यांना प्रदान करण्यात आला. वृक्षमित्र अरुण पवार यांनी तो सपत्नीक स्वीकारला. दरम्यान, हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विलास आप्पा कामटे यांनी गणपतीची मूर्ती देऊन अरुण पवार यांचा सत्कार केला.

हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने विजयादशमी आणि हिंदू शौर्य दिनानिमित्त रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित विराट हिंदू मेळाव्यात अरुण पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता ऍड. अश्विनीकुमार उपाध्याय, संस्थेचे कार्यकारी संचालक पं. धर्मवीर आर्य, पद्मश्री गिरीश प्रभुणे, उपाध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, सचिव उत्तम दंडीमे, समन्वयक कैलास बारणे, संयोजक सुहास पोफळे आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना अँड.अश्विनीकुमार उपाध्याय यांनी सांगितले की, स्वातंत्र्यानंतर मॅकलेची शिक्षण व्यवस्था स्वीकारण्यात आली. यातील दोष समजण्यास ७५ वर्षाचा काळ लागला. गुरुकुल शिक्षण व्यवस्था योग्य आहे. देशाच्या विकासातील सर्वात मोठा अडसर वाढती लोकसंख्या आहे. देश स्वतंत्र झाला त्यावेळी ४ कोटी असणारी लोकसंख्या ७५ वर्षात १४० कोटी झाली. आजही देशात ८० कोटी गरीब आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे सर्व यंत्रणेवर ताण निर्माण होतो. त्यासाठी एक भारतीय कुटुंब संहिता बनवणे आवश्यक आहे. जल, जमीन, जंगल, भूक, भेसळ, गुन्हेगारी, आरोग्य, शिक्षण या सर्व समस्यांचे मूळ वाढत्या लोकसंख्येत आहे. आता लोकसंख्येवर नियंत्रण करण्याची गरज आहे.

स्वागत, प्रास्ताविक उत्तम दंडीमे यांनी केले. वृक्षमीत्र.महाराष्ट्र शासनाने दिलेला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त श्री अरूण पवार यांचे वृक्षलागवड व सामाजिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. आर्य स्मृती समाजभूषण पुरस्कारार्थी वृक्षमीत्र अरुण पवार यांनी आजपर्यंत २५ हजाराहून अधिक वृक्षांची लागवड करीत त्यांची जोपासना केली आहे. देहू, आळंदी, तुळजापूर, उस्मानाबाद, भगवानबाबा गड (घाट सावरगाव) अशा अनेक ठिकाणी वृक्ष लागवड केली आहे. विशेष म्हणजे फक्त दिखावा किंवा प्रसिद्धीसाठी वृक्ष लागवड केलेली नसून, यातील सर्वांच्या सर्व रोपांचे वृक्षात रूपांतर झाले आहे. सहा फुटांतून अधिक उंचीची रोपे लावून पुढील तीन चार वर्षे या वृक्षांना टँकरद्वारे पाणी देऊन ही रोपे जतन केली जात आहेत. उन्हाळ्यातही झाडे वाचली पाहिजेत, अशी त्यांची भूमिका आहे. एकप्रकारे 'झाडे लावा, झाडे जगवा' या माध्यमातून ते पर्यावरणाचा समतोल राखण्याचे कार्य करीत आहेत. या कार्याची दखल घेऊन वृक्षमीत्र अरुण पवार यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.व त्यानां खंबीर साथ लोकनियुक्त सरपंच श्री बालाजी काका पवार, धारूर -मोर्डा, पुणे-पिंपरी चिंचवड चे सुजाण नागरिक देत आहेत. सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले तर आभार सुहास पोकळे यांनी मानले. (सोबत फोटो पाठवीत आहे.)

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top