राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १८३ उमेदवारांचे २२९ अर्ज दाखल

mhcitynews
0


सिटी न्युज वार्ता 

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज सायंकाळ दि. 27 पर्यंत 229 अर्ज दाखल झाले आहेत.


पहिल्या टप्प्यातील एकूण 5 लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार असून यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली- चिमूर आणि चंद्रपूरचा समावेश आहे.


आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रामटेक 51, नागपूर 62, भंडारा- गोंदिया 49, गडचिरोली- चिमूर 19 आणि चंद्रपूर 48 असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top