पहिल्या टप्प्यातील मतदार संघात " इतके " टक्के झाले मतदान

mhcitynews
0

सिटी न्यूज वार्ता 

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदार संघांमध्ये आज दि.19 एप्रिल 2024 रोजी शांततेत मतदान पार पडले असून पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 60.22 टक्के मतदान झाले असल्याची माहिती  मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.


पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय  मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे : 

९-रामटेक ५८.५० टक्के, 

१०-नागपूर ५३.७१ टक्के, 

११-भंडारा- गोंदिया ६४.०८ टक्के, 

१२-गडचिरोली- चिमूर ६७.१७ टक्के  

१३- चंद्रपूर ६०.०३ टक्के.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top