तुळजापूर प्रतिनिधी
श्री क्षेत्र तुळजापूर मध्ये सर्व सार्वजनिक उत्सवामध्ये होणाऱ्या डॉल्बीच्या वापराने धार्मिक भावना दुखावल्या जात असल्यामुळे शहरात संपूर्णरित्या- कायमस्वरूपी डॉल्बीबंदी करणे बाबतशुक्रवार दि. 19 रजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी महंत ईच्छा गिरी महाराज,महंत व्यंकट अरण्य महाराज,श्री संतोष जळके सर,जगदीश पलंगे, दयानंद शिंदे,सूरज लोंढे,अमोल कदम,विजय भोसले व इतर उपस्तीत होते.
सदरील कार्यास तुळजापुर विधीज्ञ संघ तुळजापूर,विश्व हिंदू परिषद, बजरंग दल,भाजपा तुळजापूर,शिवसेना युवा सेना,श्री तुळजाभवनीची प्रक्षाल चॅरिटेबल ट्रस्ट,गोदावरी बहुउद्देशीय संस्था,गोलाई ग्रुप शिवजन्मोत्सव समिती आणि तुळजापुर नगरीतील माता आणि भगिनी यांनी जाहीर पाठिंबा दिला.
श्रीक्षेत्र तुळजापूर संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असून, हिंदू धर्माचे धार्मिक केंद्र आहे. संपूर्ण भारत देशातून तसेच विदेशातून अनेक भाविक भक्त आपल्या धार्मिक कुलाचारासाठी तुळजापूर नगरीमध्ये वर्षभर येत असतात, परंतु गेल्या काही वर्षाची परिस्थिती पाहता धार्मिक उत्सव ( जसे श्री गणेशोत्सव, भगवान परशुराम जयंती, श्रीराम नवमी, श्री हनुमान जयंती, तथागत बुद्ध जयंती), व महापुरुषांची जयंती ( जसे छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती श्री संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्यादेवी,संत रोहिदास, महात्मा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, वस्ताद लहुजी साळवे, स्वातंत्र्यवीर सावरकर ) व इतर सार्वजनिक उत्सव यामध्ये डॉल्बीचा वापर अति प्रमाणात होत असून, या उत्सवामध्ये अश्लील नाच-गाणी, ध्वनी यांचा वापर होत मद्यपान करून अभद्र असे नृत्य करण्यात येते.
यामुळे येणाऱ्या भाविकांना तसेच शहरातील माता-भगिनी व अबालवृद्ध यांना मानसिक तसेच आरोग्यास हानिकारक असे त्रास होत आहेत. यामुळे सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक शांतता भंग होत आहे, तरी अशा उत्सवामध्ये मद्यपान करून सामाजिक शांतता भंग होण्याचे गैरप्रकार ही उत्पन्न झाले आहेत.
यापुढे जाऊन आम्ही सर्व तुळजापूरकर आपणास विनंती करत आहोत की धार्मिक व सामजिक भावना दुखावल्या जात असून, बहुअंगी भारतीय कला, वाद्य व संस्कृती त्यांचा ऱ्हास होत आहे, जास्तीत जास्त पारंपारिक वाद्यांचा वापर करून कोणताही आनंद उत्सव साजरी करावा जेणेकरून वंचित घटकातील परिवारांचा रोजगार हा या निमित्ताने पूर्ण होईल व गोरगरिबांचे कुटुंब देखील उभा राहतील. यामधे पारंपरिक वाद्य व कला याला चालना देणे , कलाकार व वादक यांना मानधन आणि मानसन्मान मिळवून देणे, भारतीय विविधांगी संस्कृतीचे रक्षण करणे, उत्सव व जयंती यांना समाज पोषक बनवणे आणि शहरामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण होईल असे निवेदनात म्हंटले आहे.
