सोयाबीनला प्रति क्विंटल दहा हजार रुपये भाव दयावा - आप चे मधुकर शेळके यांची मागणी

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या सोयाबीनला दहा ते नऊ हजार रुपये हमीभाव देण्याबाबत आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मधुकर शेळके यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी केली.


सदय स्थितीत शेतकऱ्याची आर्थीक परिस्थिती खराब असून उत्पादन खर्च वाढलेला आहे त्यात बेभरवशाचा हवामान कधी जास्त प्रमाणात पाउस तर कधी अत्यल्प पाऊस कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणीत पूर्ण कोलमडून गेले आहे अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागते पिकाला योग्य भाव नाही उत्पादन खर्चात वाढ झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे .शेतकऱ्यांच्या हितासाठी त्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरिता सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ ते दहा हजार रुपये भाव द्यावा अशी मागणी दिलेल्या निवेदनात केली आहे.


केंद्र सरकारने सोयाबीन आयात केल्यामुळे राज्यातील सोयाबीन ला कमी भाव मिळत आहे शेतकरी अडचणीत आहे मागणीचा योग्य विचार करून राज्य सरकारने तात्काळ सोयाबीन चा भाव दहा हजार करावा.

मधुकर शेळके 

जिल्हाउपाध्यक्ष आम आदमी पार्टी  

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top