सिटी न्यूज वृत्तसेवा
नवीन वर्ष सुरु होण्या आधीच शेतकऱ्यांची चिंता वाढविणारी बातमी समोर येत आहे. रासायनिक खतांच्या किमती आधीच जास्त असताना खत उत्पादक कंपन्यांनी 1 जानेवारी 2025 पासून दरवाढ जाहीर केली आहे. त्यानुसार रासायनिक खतांच्या किमतीमध्ये 200 ते 300 रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकर्यांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. शेतकर्यांना आधीच त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी अधीच मेटाकुटीला आला आहे. रासायनिक खतांचे दर अगोदरच जास्त आहेत. त्यात पुन्हा किमती वाढून शेतकर्यांना अधिकचा भुर्दंड बसणार आहे. रासायनिक खतांचे वाढते दर पाहता भविष्यात शेतकर्यांना सेंद्रिय खताचा वापर वाढवावा लागणार आहे. शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दूध व्यवसाय करतात; मात्र दुधालाही दर नसल्याने अनेक शेतकर्यांनी हा धंदा बंद केला आहे. त्यामुळे शेतकर्यांपुढील अडचणी दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत.
असे असतील दरवाढ !
वाढीव दरानुसार डीएपी (डाय अमोनियम फॉस्फेट) खताची किंमत प्रतिपिशवी 1 हजार 350 रुपयांवरून 1 हजार 590 रुपये झाली आहे. टीएसपी 46 टक्के (ट्रिपल सुपर फॉस्फेट) खताची किंमत 1300 ऐवजी 1350, तर 10:26:26 आणि 12:32:16 या खतांच्या किमती 1470 रुपयांवरून 1725 रुपये होणार आहे.
