तुळजापूर प्रतिनिधी
पञकार संरक्षण कायदा निष्प्रभ ठरत असल्याने पत्रकारांवर हल्ले वाढत असल्याच्या घटनेचा तुळजापूर पञकार संघा तर्फे जाहीर निषेध करीत लेखी तक्रारी निवेदन राज्याचे मुख्यमंत्री यांना तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या मार्फत देण्यात आले.
तक्रारी निवेदनात नमूद केले आहे की, पत्रकारांना संरक्षण मिळावे यासाठी पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आल्यानंतरही पत्रकारांवरील हल्ले वाढतच आहेत. जबाबदार लोकप्रतिनिधी कडूनही पत्रकारांवर हल्ले होत असल्याच्या घटनेचा तुळजापूर पञकार संघा तर्फ जाहीर निषेध करीत असून, पाचोरा जि. जळगाव येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांनी दिलेल्या अर्वाच्च शिव्या आणि नंतर त्यांच्यावर जो भ्याड हल्ला करण्यात आला. महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. राज्यात गेल्या वर्षभरात 46 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. पोलीस पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ करत असल्याने हा कायदा सर्वार्थाने कुचकामी ठरत असल्याचे म्हंटले आहे. निवेदनावर पत्रकार गोविंद खुरूद, श्रीकांत कदम, गुरुनाथ बडूरे, संजय खुरुद, प्रदीप अमृतराव, सतीश फत्तेपुरे, सचिन ताकमोघे, सिद्धीक पटेल,अजित चंदनशिवे, ज्ञानेश्वर गवळी, अमीर शेख व फोटोग्राफर सतीश पवार इत्यादींच्या साक्षर आहेत.
