तुळजापूर प्रतिनिधी
राज्यसकारने वर्ग -२ ची जमीन वर्ग -१ करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाची लवकर अंमलबजावणी करणे बाबत आम आदमी पार्टीच्या वतीने सोमवार दि. 26 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र सरकारने नुकताच वर्ग - २ जमीने वर्ग -१, करण्याचा निर्णय घेतलेला आहे , त्या अनुषंगाने सदरील निर्णय प्रक्रिया बाबत संबंधीत कार्यवाही लवकरात लवकर करून सदरील निर्णयाची अमंलबजावणी करण्यात यावी सरकारने घेतलेला निर्णया मुळे अनेकांना याचा फायदा होणार आहे सदरील निर्णयाची अमलबजावणी त्वरीत करण्यात यावी याकड़े अनेक नागरिकाचे शेतकऱ्यांचे लक्ष लागून असून,
कारण, धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे शेती जमीन वर्ग 1 मधुन 2 मध्ये गेल्या आहेत गेल्या 40 ते 50 वर्षे पासुन शेती वर्ग एक असताना गेल्या वर्षी अचानक भोगवाट वर्ग दोन केल्या मुळे बँकेत लोन कर्ज मिळत नसल्याने जिल्ह्यातील सर्व शेतकरी अडचणीत आल्याने राज्य सरकार वर्ग दोन ची शेती जमीन लवकरच वर्ग एक करण्याची घोषणा केली. वर्ग - २ जमीने चे वर्ग १ मध्ये समाविष्ट करण्याच्या निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी बाबत योग्य तो सकारात्मक कार्यवाही करावी असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मधुकर शेळके, शहर अध्यक्ष किरण यादव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
