बसेसच्या अपघातामुळे प्रवाश्यांची सुरक्षा ऐरणीवर

mhcitynews
0

नादुरुस्त बसमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला 


मोडकळीस आलेल्या बस ठरताहेत सर्वांची "डोकेदुखी"

                

तुळजापूर प्रतिनिधी 

राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात एस टी बसेस चे ब्रेक फेल होने रस्त्यातच बसेस तांत्रीक बिघाड येऊन बंद पडणे अश्या घटना मोठया प्रमाणात होत आहेत त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अपघात झाले आहेत .सर्वसामान्य मध्यमवर्गीय गरीब कुटुंबाचे प्रवासाचे सोयिस्कर सुरक्षित साधन हे एस टी बस आहे . यामध्ये मोठ्या प्रमाणात राज्यातील नागरीक , जेष्ट नागरिक , महिला तसेच शालेय विद्यार्थी  मोठ्या प्रमाणात दैनंदीन प्रवास करतात मात्र मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात  नादुरुस्त तांत्रीक बिघाडामुळे  बसेस प्रवासातच बंद पडने , इंजिन खराब होने ब्रेक फेल होणे अश्या घटना मोठया प्रमाणात घडत आहेत त्यामुळे अपघात होत आहेत .



राज्यातील  सर्व एस .टी बसेसचे अनुभवी तज्ञा मार्फत तांत्रीक तपासणी ऑडीट करून नादुरस्त मोडकळीस आलेल्या बसेस मधुन प्रवासी वाहतुक करणे थांबवावे व नवीन बसेस राज्य महामंडळाला उपलब्ध करून द्यावेत याबाबत  आम आदमी पार्टी धाराशिव च्या माध्यामातून  जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्तेमधुकर शेळके यांच्या वतीने तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. व सदरील निवेदनाची त्वरीत दखल घेतली जाईल व  राज्यातील जनतेचा " सुरक्षित व आनंदायी प्रवास "  लवकर  होईल अशी अपेक्षा याद्वारे व्यक्त केली आहे. निवेदनावर  शहर अध्यक्ष किरण यादव आणि  स्वप्नील शितोळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



"बसेस मधुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत घेउन प्रवास करावा लागत आहे "


सर्वसामान्य मध्यवर्गीयाचे प्रवासाचे विश्वसनीय सुरक्षित साधन एसटी बसेस आहे . सनासुदीच्या कालावधीत  सुट्या मध्ये एसटी बसेसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शासनाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होते. महामंडळ मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.


मधुकर शेळके...

जिल्हा उपाध्यक्ष आम आदमी पार्टी 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top