तुळजापूर प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील जुने एस.टी. बसस्थानक पाडून नव्याने उभारण्यात आलेल्या टेन्सल फॉर्बिक (Tap Roof) बसस्थानकाच्या कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे, बोगस पद्धतीने व अंदाजपत्रकाच्या दुहेरी खर्चात करण्यात आल्याने महाराष्ट्र शासन व एस.टी. महामंडळाची फसवणूक झाल्याचा ठपका या नेत्यांनी लावला आहे.
यासंदर्भात वारंवार तक्रारी देऊनही प्रशासनाने कोणतीही चौकशी अथवा कायदेशीर कारवाई केली नसल्याने, ३ जून २०२५ रोजी तुळजापूर येथील बसस्थानक परिसरात ‘बोंब मारो आंदोलन’ करण्यात येणार असल्याची घोषणा महाविकास आघाडीने केली आहे.
या निवेदनावर धीरजभैय्या कदमपाटील, अमोलजी कुतवळ, ऋषिकेश मगर, श्याम पवार, सुनील जाधव, सुधीर कदम, दीपक थोरात, नरेश पेंदे, किरण यादव, आकाश शिंदे, अजयभैय्या साळुंखे, प्रदीप मगर, अक्षय धनंजय कदम, अनमोल साळुंखे, नागनाथभाऊ भांजे, राहुलजी खपले, उत्तमनाना अमृतराव, महादेव देवकर, प्रदीप मगर यांसारख्या विविध नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नेत्यांचा आरोप आहे की, बांधकामात माती मिक्स टस्टचा वापर करून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेले असून, वाळूऐवजी दगडांचे मिश्रण वापरले गेले आहे. या कामांची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी व झालेला आर्थिक अपहार शासनाकडे वसूल करावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
सद्या नागरिकांमध्ये याविषयी तीव्र संताप आहे आणि जर प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली नाही, तर हे आंदोलन व्यापक रूप घेऊ शकते, असा इशारा देखील देण्यात आला आहे.