“पहले लढे थें गोरो से, अब लढेंगे चोरो से” अशा घोषणा देत जनआक्रोश
तुळजापूर प्रतिनिधी
लोकशाहीतील जनादेशाचा अपमान व निवडणूक आयोगाची भूमिका यावर जनजागृतीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने तुळजापूरात भव्य मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रारंभ झालेली ही रॅली भवानी रोड, आर्य चौक, कमान वेस मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात संपन्न झाली.
रॅलीदरम्यान “पहले लढे थें गोरो से अब लढेंगे चोरो से”, “लोकशाही वाचवा – देश वाचवा” अशा घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मांडलेल्या “वोट चोरी” या मुद्द्यावर निवडणूक आयोग अद्याप मौन बाळगत असल्याचा मुद्दा मांडत या रॅलीतून तीव्र जनआक्रोश नोंदविण्यात आला.
रॅलीनंतर झालेल्या मार्गदर्शन सभेत उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी सर व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज भैया पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रामदादा आलूर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, अमर चोपदार, तोफिक शेख, विवेक शिंदे, जनसेवक अमोल कुतवळ, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अर्जुन साळुंखे, भरत जाधव, कालिदास नाईकवाडी, नवनाथ जगताप, उत्तम अमृतराव, किरण खपले आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
या रॅलीतून तुळजापूर शहरात महाविकास आघाडीने पुन्हा एकदा आपली संघटित ताकद दाखवून दिली.